नोटांवर बंदी ..
मंगळवार दि. ८ नोव्हेंबर, २०१६ हा सर्वसामान्य दिवस. परंतु त्या दिवशी काही वेगळ्याच घटना घडतील असे अजिबात वाटत नव्हते. ब्रिटनच्या पंतप्रधान भारत दौर्यावर आल्या होत्या. अमेरिकन अध्यक्षपदाचा निकाल अपेक्षित होता. संध्याकाळी मात्र काहीतरी वेगळं घडणार असल्याची चाहूल लागायला सुरुवात झाली.
मा. पंतप्रधानांनी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक बोलावली असल्याची बातमी येऊन थडकली. ही एक नेहमीची घटना असेल असे वाटून अनेकांनी त्याकडे विशेष लक्षं दिल नाही. परंतु, अचानक मा. पंतप्रधानांनी तीनही सेनादलाच्या प्रमुखांना पाचारण केल्याची बातमी टी
होय, मा. पंतप्रधानांनी युद्धच पुकारलं होत. पण ते युद्धं होतं खोट्या नोटांविरुद्ध, काळ्या पैश्या विरुद्ध, अवैध संप्पत्ती विरुद्ध, भ्रष्टाचारा विरुद्ध. आणि हे युद्ध पुकारताना मा पंतप्रधानांनी सर्व जनतेला विश्वासात घेऊन, सर्वांना सहभागी होण्याचे आवाहन करत ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा रात्री १२ नंतर रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. हा निर्णय समजताच काही वेळ गोंधळच, अस्थैर्याच वातावरण निर्माण झालं. जे अनावश्यक होतं.
हे करण्याची गरज का निर्माण झाली.
असा निर्णय घेण्याची गरज का निर्माण झाली
आपण काय करायचे.
हा निर्णय जाहीर झाल्यावर सामान्य जनतेला आकाश कोसळल्यासारखं वाटलं, ज्याची खरं म्हणजे आवश्यकता नव्हती. सरकारने तसेच रिझर्व्ह बँकेने आपल्या जवळील १००० व ५०० च्या नोटा बँकेत भरण्यासाठी अथवा बदलून घेण्यासाठी ३० डिसेंबर २०१६ पर्यंतची मुदत आहे हे वारंवार समजाऊन सांगितलं आहे तरी देखील अनेक लोकं तहान-भूक विसरून, बँकेबाहेर, पोस्टाबाहेर तासंतास रांगेत उभे राहून अमूल्य मनुष्य तास वाया घालवत आहेत. ज्याची खरं म्हणजे आवश्यकता नाही. काही दिवस कमी मूल्यांच्या नोटांची चणचण भासेल यात वाद नाही. पण हा काही दिवसांच प्रश्न असेल हे समजून घेण्याची गरज आहे. खोट्या नोटांचा सूळसुळाट, काळा पैसा, अवैध संपत्ती निर्माण, आर्थिक आतंकवाद, भ्रष्टाचार याला आळा घालायचा असेल तर आपण जागरूक होण्याची सावध होऊन देशासाठी योगदान देण्याची गरज आहे.
रोकड विरहित अर्थव्यवस्था.
जुन्या उच्च मूल्यांच्या नोटांचं रद्दीकरण म्हणजे रोख विरहित अर्थव्यवस्थेच्या दिशेने टाकलेले पाऊल ठरावे. यामध्ये सर्वसामान्य जनतेपासून सर्व आर्थिक संस्थांचे सहकार्य आवश्यक आहे. आज विविध दुकाने, आस्थापना, मॉल, रेल्वे आरक्षण, विमान प्रवास इ. सर्व ठिकाणी क्रेडिट कार्ड अथवा डेबिट कार्ड वापरता येते आहे. त्याची व्याप्ती वाढविण्याची आवश्यकता आहे. याच्या यशस्वीतेसाठी माहिती तंत्रज्ञान विभाग, दूरसंचार व मोबाइल कंपन्यांचा सिंहाचा वाटा असणे गरजेचे आहे.
नॅशनल पेमेंट कोंर्पोरेशन ऑफ इंडिया
एन
आज ऑन लाइन पेमेंट व्यवस्थेमध्ये काही परदेशी कंपन्यांची मक्तेदारी निर्माण झाली आहे. त्याचा बिमोड करणे गरजेचे आहे. रुपे कार्ड हे भारताचे कार्ड आहे त्याचा सर्वांनीच स्वीकार केलाच पाहिजे, असा दंडक करण्याची आवश्यकता आहे. एल
रुपे डेबिट कार्ड.
रुपे डेबिट कार्ड बाजारात आणताना सहकारी बँका एन
मोबाइल बँकिंग (आय
एन
कोणी म्हणेल की हे फक्त शहरी भागात शक्य आहे तर ते पूर्णपणे दिशाभूल करणारे आहे. कारण आज अन्न, वस्त्र, निवारा या प्रमुख गरजांबरोबरच, मोबाइल ही जीवनावश्यक वस्तु झालेली आढळून येईल. माध्यम क्रांतीचा प्रसार आणि ओढ सगळीकडे निर्माण झाली आहे. आज ग्रामीण भागातील जनतेकडेही स्मार्ट फोन सर्रास दिसून येतात. केवळ नेट कनेक्शन असेल तरच या सुविधा उपलब्ध असतील असे नव्हे तर केवळ एस
म्हणूनच या विषयाची जंनजागृती करणे गरजेचे आहे॰ सोशल साइट्स, यू ट्यूब वर वेळ घालवण्यापेक्षा याचा वापर अर्थ साक्षरतेसाठी झाल्यास आणि आपण सर्वांनी ते आत्मसात केल्यास या बदलाला आपण समर्थपणे तोंड देऊ शकू.
सुरक्षितता
आज ऑनलाइन पेमेंट, डेबिट / क्रेडिट कार्ड वापर, मोबाइल बँकिंगचा वापर करायचा म्हटलं की त्याच्या सुरक्षिततेविषयी काही जणांच्या मनात शंका निर्माण होतात. त्या काहीश्या योग्यही असतील, पण त्यासाठी बहुतांशवेळा आपणच जबाबदार असतो. पेमेंट साठी आपण आपला पासवर्ड लक्षात ठेवणे, तो कोणालाही न सांगणे, कोणत्याही प्रलोभनला बळी न पडणे ही काळजी आपण घेतली तर ही सर्व पेमेंट पुर्णपणे संरक्षित आहेत सुरक्षित आहेत, याबद्दल खात्री बाळगावी.
व्यापकता
रोकड विरहित व्यवहारांमध्ये काही सेवा समाविष्ट करता येतील की नाही याबद्दल शंका उपस्थित होऊ शकतात. जसे दैनंदिन रिक्षा प्रवास, भाजी
स्वच्छ भारत अभियान क्रमांक २
नोटांवर बंदी ही बदलाची संधी आहे. रोकड विरहित व्यवस्थेची ही नांदी ठरावी. यामध्ये आवश्यकता आहे ती आपल्या सहभागाची. हा बदल संधीत रूपांतर करण्याची. मी जास्तीत जास्त रोकड विरहित व्यवहार करेन आणि या आगळ्या वेगळ्या स्वच्छ भारत मोहिमेत स्वतः झोकून देईन अशी शपथ घेण्याची ही वेळ आहे.
अनेक देशप्रेमी ही संधी घेतील अशी आशा बाळगूया॰
उदय पेंडसे
डोंबिवली
9869034662.